Friday 13 March 2015

हरवलेली कवितांची वही...

हरवलेली कवितांची वही...एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतूनकसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेलमहाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानंसगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनातपुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवतत्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली वदरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेतहोते..लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसाराततिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवारव्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिनमहिण्याची गरवार..काही बोलला हा की बिचारी काही नबोलता गुपचूप टिपंगाळायची..तो ड्युटीला गेला की मोकळ्या घरातश्वासाला कोंडून घ्यायची मनासारखी..!निदान सासुसासरे इथंअसते तर घरात माणसे दिसली असती..सुखदुःखबोलता आलं असतं...!!''स्वातीsssअगं मेलीस काय?? कुठायसं. ?'' नी त्यानेरागारागात ओफिसबॅग सोफ्यावर फेकली.शर्टाच्या बाहीचेबटन उघडे करत तो बेडरुममध्ये पोचला..ती निवांतझोपलेली होती..तिच्या श्वासागणिकवरखाली होणार्या वाढत्या पोटाकडे बघितलं..दोन क्षणतो सगळं विसरला. .त्याच्यातला माणुस जिवंत असण्याचं हेएक लक्षण होतं खरं पण लगेचच तो भानावर आला.''काय ग??केव्हाच्या हाका मारतोय तुला,कान फुटलेयतका?'' मेघ गरजला होता..ती गरबडीने जागी होवूनकशीबशी उभी राहिली..धरणी मेघाच्या आवाजाने आनंदीतहोण्याएवजी लटपटत होती..''बोल ना??काय मुर्खासारखी उभी राहिलीस नुसती..अक्कलकवडीची नाही..निदान नवरा आला तर दरवाजात तरी दिसावंबायकोने..''तिला हे रोजचचं होत..तरिही रोज जुनं मन नव्यानं भरुनयायचचं..!''अहो..दुपारपासून गरगरल्यासारखं होतं होते..कंबरनी पाठही फार दुखत होती..वाकल्याही जातनव्हतं..गोळ्या घेवून जरा पडली आणि डोळा लागला''.विटनेस बोक्समध्येउभ्या असलेल्या अशिलासारखा तिचा चेहरा घाबरला होता..''मग..आराम पडला ना आता??बाकी बायांना काय आपोआपमुलं झालीत..विनात्रासाची..कंबर नी पाठ दुखतेय हिची...चलमी फ्रेश होतो..जेवायला वाढ लवकर..''''अहोss मी काय म्हण..'' तीचं बोलणं न ऎकताचतो बाथरुमकडे वळाला..लुंगीने हातपाय पुसल्यावर त्याने ती कमरेला गुंडाळली..जेवणाच्या टेबलकडे वळला..ती टेबलाच्या कोपर्यावर नुसतीचउभी होती..टेबलावर जेवणाची कसलीच तयारी नव्हती..''काय आहे हे?? तुला सांगितल होत ना...लवकर वाढम्हणून??तुला समजत नाही का गं?? नवरा इतका दमूनभागूनआल्यावर त्याला जेवायला न वाढता फक्त उचल्यासारखंत्याच्याकडे बघतेस''तो पुन्हा तीचा अंत पहात होता..''अहो..दुपारी त्रासामुळे झोप लागली..अनआता तुमच्या आवाजानेच जागआली..तुम्ही बसा ..मी आता पंधरा मिनिटात स्वयपांककरते..'' असं म्हणत,पदर कंबरेला खोचत ती मलूल चेहर्यातमोठ्या आर्जवाने उत्तरली...''बस्स कर...नवरा इतका दमून येतो..निदान जेवण तरी वेळेवरद्याव माणसानं..मी साला मर मर काम करतो..कुणासाठी??तुमच्यासाठीच ना..अन तुला साधं इतकही जमू नये??कायकाम असतं ग तुला ऎरवी??खबरदार..आता स्वयंपाककरशील तर...सगळा फेकून देईन..याद राख. अजिबातस्वयंपाक करायचा नाहीस आज...कळलं का..मुर्ख साली..बरंझाल असतं...जोश्या आज चायनिजला नेणारहोता ऒफीसनंतर..उगाच नाही म्हटलो..''रागारागात त्याने पुन्हा कपडेचढवले,बाईकची चावी घेतली,स्लिपर घातली व बाहेरपडला...दरवाजाचा धाडकन आवाज झाला...हिच्या कातरमनाचा बांध पुन्हा फुटला होता..तो बाहेर आला..मन सुन्न झाले होते..रफिकच्या पानटपरीपुढेबाईक थांबवली..बोटांनी इशारा केला..रफिकने नेहमीप्रमाणेदोन विल्स नेव्हीकट त्याला लांबवले व डायरीत नोंदकेली..बाईक त्याने तिथेच लावली..थोडासा समोर चालत जातनागेशच्या नारळपाणी दुकानाजवळच्या दगडी पुलावरतो आरामात बसला..बायकोचा तिव्र राग येत होता...विल्सशिलगावून तो रागारागात झुरके मारत होता..झुरक्यागणिकमनावरचं आभाळ,त्रागा कमी होत होता..बराच वेळ तो बसूनहोता..तिथेच निश्चल...पुलापलीकडे काही रोडबनविणार्या कामगारांची पालं होती..त्यातून एका पालामधूनएक जोडपं बाहेर पडल..नवराबायको असावेत..ती गरवारदिसत होती..तो तिला आधार देत,हळुवारपणे चालतहोता..दोघांचेही चेहरे फुललेले दिसत होते..व डोळ्यातकौतुकाचे भाव होते..त्याच कुतुहल वाढलं..त्यांच्या लक्षातन येवू देता तो त्यांना न्याहाळू लागला..जोडपं हळुवार पावले टाकत..रोडपर्यन्त आली...तिथूनपुन्हा संथ गतीने पुलापर्यन्त..त्याने बायकोला पुलावरबसवले व म्हटले..''बैस हिथंच..जादा पायपिटबी नगं..मी नारळाच पाणी आणतो तुलं..'' बायको कौतुकानंपोटभरुन हसली..ह्याला त्याच्या बायकोची आठवण झाली..सालंमी इतक्या प्रेमानं बायकोला कधी जवळ घेतल??दिवसराहिल्यापासुुन कधी तीला काय हवं नको ते विचारल??तो आठवू लागला..पण अपेक्षित उत्तर येईना..त्याच मनत्याला खात होतं..इतक्यात जोडप्यातला नवरा एक नारळ कापून घेवूनआला..स्ट्राँ टाकून बायकोच्या तोंडापुढ नारळ धरलं..वप्यायचा आग्रह करु लागला..बायको लाजत होती..ह्याच्याकडे बघुन तो पुरुष उत्तरला..''आवं लाजतीसकशाला?त्या साहेबास्नी बी बायकू आसलचंकी,तेबी बायकुचा लाड आसाच करत आसतील की..व्हयना साहेब??''तो बळेबळे कसनुसं हसला..मन खात होतं,अपराधीपणाचआभाळ आताशा दाटून येत होतं..स्वतःच्याझालेल्या चुका समोरच्या नारळपाण्यात स्पष्ट दिसतहोत्या..''आवं घे की सम्द..वढं वढं.. डाक्तर मनले न लेकरू गोरपानंव्हत म्हणून..मंग घे..'' नवरा तिला आग्रह करीत होता..''घेतेनं पण चला घरला मंगपिईन..तुमास्नी भूकबी लागली असलं,सैपाक करा लागीलमलं..'' बायको अजुनही लाजत होती...''होत राहिल सैपाक..तुह्यापुढं लय हाये का??मी करु लागीनतुलं..मंग त झालं..??इकडे याच्या डोळ्यांच्या कडांवर आतल्या पावसाचे हलकेथेंब जमा झाले होते..मन कस लख्ख झालंहोत..काळजातला हळवा कप्पा उघडल्या गेला होता,मनाला पंखफुटले होते..समोरच संभाषन ऎकण्याची मनस्थिती होती पणस्वतःच्या घरात..तो निर्धारानं उठला..''नागेश दो इधर ला..''अस म्हणून दोन नारळ त्याने घेतले..बाईकजवळ आला..किकमारली...समोर येवून चायनिज काॅर्नरवर पार्सल घेतलं...वसुसाट निघाला..रोज भरभर आवाज देणारी बाईक आज हळुवार जातहोती..आभाळ पुन्हा एकदा निरभ्र झालेहोते..हरवलेली कविंताची वही पुन्हा सापडली होती....मनातला संदिपखरे काॅलेजनंतर प्रथमतः पुन्हा एकदा कवितांच वाचन करीतहोता..सगळं कसं हवहवसं वाटत होतं..फुग्यातलीहवा निसटून,फुगा उंच उडून जात होता....!!

No comments:

Post a Comment